Posts

Showing posts from March, 2021

हेतूची शुद्धी

Image
सत्याचा शोध घ्यायचा आहे? मग आपल्या अंगी दोन गोष्टी हव्यात: एक हेतूची शुद्धी आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रामाण्यावाचून जगण्याची हिंमत. आपल्याला नेमकं काय हवं आहे ते मनुष्याला बहुतेकदा कळत नाही. अनेक दिशांनी मनुष्य धावपळ करतो, पण काय मिळालं म्हणजे आतून शांत वाटेल, समाधान वाटेल, तृप्ती येईल.. कळतच नाही.    आपल्याला मार्गदर्शक, गुरु हवा असतो, तो तरी कशासाठी? ...आपल्यासाठी काय हितकर आहे हे सांगणारा हवा आहे का कुणी? आपल्या विचार, भावना, इच्छांना संमती देईल असा कुणी हवा आहे? आशीर्वाद देणारा कुणी हवा आहे? करमत नसेल, कंटाळा येईल तेव्हा ज्याच्यापाशी जाऊन बसता येईल असा कुणी मनुष्य हवा आहे का? जुन्या नातेसंबंधांना मन विटलं आहे, तर नव्या प्रकारचा संबंध म्हणून गुरु हवा का? ..पण त्यानं सांगितलेलं आपल्याला पटलं नाही तर! आपल्या मनाला, अहं ला रुचलं नाही तर! तर काय करायचं? त्याच्या शब्दांची, वचनांची मोडतोड करायची, विपर्यास करायचा? आपल्या सोयीप्रमाणे वाकवून मग ते ग्रहण करायचे?   काय हवंय काय? मानसिक संरक्षण हवं आहे का? आपण आहोत तसे स्वीकारणारा हवा आहे का कोणी?   ...ही स्वतःची जी ओळख आह...

धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे

Image
समाजव्यवस्था आकारास येत गेल्या तसे एकामागून एक ढाचे निर्माण होत गेले - राजकीय ढाचे, आर्थिक ढाचे, शैक्षणिक ढाचे...अनेकानेक structures.  यातून संस्कृती आकारास येत गेल्या. जीवनात आपण प्राप्तीची क्षेत्रं निर्माण केली व धर्मालाही प्राप्तीच्या क्षेत्रातच घालून मोकळे झालो. ज्याप्रमाणे आम्ही घर बांधतो, दुकान थाटतो त्याप्रमाणे ही सृष्टी बनवणारादेखील कोणीतरी असला पाहिजे असं आम्हीच ठरवून टाकलं व साक्षात् ईश्वराला जन्माला घातलं.    या ईश्वराचे गुणदेखील आम्ही निश्चित केले: तो नेहेमी न्याय करेल, अन्याय करणार नाही, तो प्रेम करेल, क्षमा करेल, पुण्याला इनाम देईल, पापाला शिक्षा देईल, मृत्यूपश्चात आम्हाला स्वर्ग-नरक देईल वगैरे सगळं आम्ही ठरवून टाकलं. ‘ईश्वर’ नावाचं एक अधिकारस्थान, एक authority निर्माण केली. बिचारा ईश्वर, त्याला नकार देण्याची सोय नव्हती, कारण आमच्या त्या बापाचे बाप आम्ही होतो! आमचा स्वतःवर विश्वास तर नाहीच. ‘आमचे परस्परसंबंध, आमची नीतिमत्ता सगळं आमचं आम्ही पाहून घेऊ’ असं म्हणण्याची हिम्मत आमच्यात नाही. आम्हाला प्रत्येक ठिकाणी डोक्यावर बसणारी अधिकारी मंडळी पाहिजेत. बनावट ईश्व...

कर्म हेच फळ

Image
जोपर्यंत कर्म हाच आनंद बनत नाही, जोपर्यंत कर्माच्या बाहेर काहीतरी, कोठूनतरी, कसलंतरी सुख मिळणार आहे अशी तुमची भ्रांती राहील, तोपर्यंत दुःखच दुःख तुमच्या वाट्याला येणार आहे. वास्तविक आपल्या कर्मात, आपल्या आत्म-अभिव्यक्तीत तुम्हाला तृप्ती का वाटू नये? समाधान का मिळू नये? 'मला जगण्याची संधी मिळाली अन् मी जगलो, परिणामांची, फळाची तमा न बाळगता जगलो' - असं असेल तर मनुष्याला कर्म करण्यात आनंद होईल. आनंदासाठी परिणामांची प्रतिक्षा करावी लागत नाही, 'पुढं काय होतं पाहू' असं म्हणावं लागत नाही. आत्ता मी जे केलं, इथे मी जे केलं त्यातच मी तृप्त झालो, संतुष्ट झालो. ..कर्म करावं अन् तेवढ्यापुरतं मरून जावं! खरंच, प्रत्यक्ष मरणघटका येण्याची वाट का पहावी माणसानं? एकेक कर्म करीत जावं, तिथंच पूर्णतृप्ती साधावी, परिणामांना म्हणजे सुखदुःखांना तिलांजली द्यावी, त्यांच्या स्मृती साठवत, उगाळत बसू नये. जे व्हायचं होतं ते झालं, जेवढं करता येण्यासारखं होतं तेवढं केलं. विषय संपला!   सुख झालं, दुःख झालं; हसू आलं किंवा रडू आलं म्हणून काय बिघडलं? काय हरकत आहे? पण तुम्ही ती गोष्ट तिथेच संपू देत नाही, विरून...

दीक्षा

Image
* हे भाषांतर माझं नाही.*     ...आपला भूतकाळ सोडून देण्याची तयारी म्हणजे दीक्षा. माझं अस्तित्व म्हणजे माझा भूतकाळ नव्हे, भविष्यकाळदेखील नव्हे, अस्तित्व म्हणजे केवळ वर्तमान हे पूर्णतः उमजून घेण्याची तयारी म्हणजे दीक्षा.    यजुर्वेदातील एका सूत्राची सुरुवात 'व्रतेनं दीक्षां आप्नोति...' अशी होते. म्हणजे व्रतातून म्हणे दीक्षा येते. छे! व्रताचा दीक्षेशी कसलाही संबध नाही.  व्रत म्हणजे खरंतर आत्म-अनुशासित जीवन. व्रतातून दीक्षा कशी येईल? दीक्षेविना व्रत येईल कसं?    व्रत म्हणजे शपथा वगैरे नव्हेत. उदा. जो माणूस खरं बोलण्याचं व्रत घेतो, तो आपल्या अंगी खोटं बोलण्याची प्रबळ ऊर्मी असल्याचीच घोषणा करत असतो. अंतरंगी असलेल्या खोट्याच्या आकर्षणानं तो घाबरून गेलेला असतो. खोटं बोलण्याची प्रवृत्ती दाबून टाकण्याचे आडदांड प्रयत्न करून पाहतो - ते असफल ठरतात. मग तो गर्दीसमोर, धर्मोपदेशकांसमोर, जाहीररित्या शपथ घेतो, व्रत घेतो: 'मी खरं बोलेन'.  लोकांसमोर व्रत घेतलं आहे, तेव्हा व्रताचा भंग करणं म्हणजे समाजाला आपल्याप्रती असलेला आदर गमावून बसणं. असली व्रतं ही अहंकाराची अभिव्य...

विचार मौलिक (original) असतच नाहीत, अनुभूती मौलिक असते

Image
* हे भाषांतर माझं नाही.*   प्रश्न: एकीकडे आपण गीता, बायबल, कुराण आदी धर्मग्रंथांद्वारे प्रतिपादित धर्म मानत नाही. मग त्यांचे विचार का म्हणून चोरता?   रजनीश (ओशो) : ...काही दिवसांपूर्वी जे. कृष्णमूर्तींच्या एका अनुयायाचं पत्रं आलं. माझ्या विचारांमध्ये कृष्णमूर्तींच्या विचारांची झलक दिसते असं त्याचं म्हणणं आहे. स्वाभाविक आहे. पण हेदेखील लक्षात घ्या, की कृष्णमूर्तींच्या बोलण्यात बुद्धाची झलक आहे, लाओ त्सूची झलक आहे, उपनिषदांची छाप आहे. त्यांच्या विचारांमध्ये झेन गुरुंची पुनरुक्ति आहे. याचा अर्थ 'कृष्णमूर्तींनी उपनिषदांतून विचार चोरले' असा घ्यावा का? - नाही, तसं म्हणणं चुकीचं ठरेल. माझी तर अशी धारणा आहे, की विचार मौलिक असतच नाहीत. भाषा मौलिक असतच नाही. 'मौलिक' (original) या शब्दाचा अर्थ समजावून घ्या. 'मौलिक' म्हणजे मुळापासून, उगमापासून, स्रोतापासून आलेलं. शब्द मौलिक नाहीत, ते शतकानुशतकांच्या परंपरेतून आलेले आहेत. पण शब्दांचा वापर करावा लागतो, बोलावं तर भाषेतच लागतं! त्याला इलाज नाही. दुर्दैव असं, की भाषेची वस्त्र चढवू लागताच अनुभूती गायब होते, लुप्त होते.  ज्याला ख...

सहजता, संघर्षमुक्तता

Image
सहजता ही मनोवैचारिक गोष्ट नव्हे. मुद्दामहून अंगी बाणवलेली सहजता, साधेपणा म्हणजे निव्वळ धूर्तपणे केलेली तडजोड असते, सुख-दुःखाच्या भोगापासून बचाव व्हावा यासाठी ती केली जाते.  ही स्वतःला स्वतःतच कोंडून घेण्याची क्रिया असते, आणि हीतून नानातऱ्हेचे संघर्ष, संभ्रम उद्भवतात.   संघर्षमुक्त होण्यातून सहजता येते, संघर्षावर मात करण्यातून नव्हे. एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवावा लागतोय याचाच अर्थ ती पुन्हा पुन्हा नियंत्रणाखाली आणावी लागतेय. मग संघर्ष निरंतर चालूच राहणार. संघर्षाचं आकलन करून घेणं म्हणजे इच्छा, वासनेचं आकलन करून घेणं.     निरीक्षणकर्ता व निरीक्षित केली जाणारी एखादी गोष्ट, यांची जी प्रक्रिया असते तीत द्वैत नसतं, ती अखंड प्रक्रिया असते. या प्रक्रियेच्या एकात्म वास्तवाची अनुभूती आली तरच वासना, कलहांतून मुक्तता होते. 'हे वास्तव कसं बरं अनुभवता येईल?' असा प्रश्न विचारून उपयोग नाही. ते स्वाभाविकपणे घडून यायला हवं. दक्षता, अक्रिय, ग्रहणशील सजगता असेल तेव्हाच ते घडून येईल. ...खोलीत बसल्या बसल्या, कल्पनारंजन करून विषारी सापाला सामोरं जाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार नाही. खर...