हेतूची शुद्धी
सत्याचा शोध घ्यायचा आहे? मग आपल्या अंगी दोन गोष्टी हव्यात: एक हेतूची शुद्धी आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रामाण्यावाचून जगण्याची हिंमत. आपल्याला नेमकं काय हवं आहे ते मनुष्याला बहुतेकदा कळत नाही. अनेक दिशांनी मनुष्य धावपळ करतो, पण काय मिळालं म्हणजे आतून शांत वाटेल, समाधान वाटेल, तृप्ती येईल.. कळतच नाही. आपल्याला मार्गदर्शक, गुरु हवा असतो, तो तरी कशासाठी? ...आपल्यासाठी काय हितकर आहे हे सांगणारा हवा आहे का कुणी? आपल्या विचार, भावना, इच्छांना संमती देईल असा कुणी हवा आहे? आशीर्वाद देणारा कुणी हवा आहे? करमत नसेल, कंटाळा येईल तेव्हा ज्याच्यापाशी जाऊन बसता येईल असा कुणी मनुष्य हवा आहे का? जुन्या नातेसंबंधांना मन विटलं आहे, तर नव्या प्रकारचा संबंध म्हणून गुरु हवा का? ..पण त्यानं सांगितलेलं आपल्याला पटलं नाही तर! आपल्या मनाला, अहं ला रुचलं नाही तर! तर काय करायचं? त्याच्या शब्दांची, वचनांची मोडतोड करायची, विपर्यास करायचा? आपल्या सोयीप्रमाणे वाकवून मग ते ग्रहण करायचे? काय हवंय काय? मानसिक संरक्षण हवं आहे का? आपण आहोत तसे स्वीकारणारा हवा आहे का कोणी? ...ही स्वतःची जी ओळख आह...