Posts

Showing posts from 2021

एक चिनी शेतकरी...

Image
कोण्या एके काळी चीन देशात एक शेतकरी होता. एके दिवशी त्याचा घोडा तबेल्यातून पळाला. ही बातमी ऐकून त्या संध्याकाळी गावकीतली मंडळी शेतकऱ्याच्या घरी जमली. "च्च च्च च्च... तुझा घोडा पळाला ना.. फार वाईट झालं." शेतकरी म्हणाला, "ह्म... कदाचित".   दुसरे दिवशी घोडा परत आला. त्यानं आपल्याबरोबर आपले सात रानटी भाईबंद आणले.  तिन्हीसांजेला गावकरी मंडळी नेहेमीप्रमाणे शेतकऱ्याच्या ओसरीवर जमली. "काय शिकंदर नशीब आहे! सात घोडे आयते घावले की तुला! झ्याक झालं." शेतकरी म्हणाला, "हो - कदाचित."   तिसरा दिवस उजाडताच शेतकऱ्याच्या मुलाने रानटी घोड्यांना माणसाळवण्याचं काम हाती घेतलं. पैकी एका घोड्यावर स्वार होऊन रपेट करू लागला. घोड्यानं मुलाला आपल्या पाठीवरून उडवून लावलं. मुलाचा पाय मोडला.  शिळोप्याच्या गप्पा करताना मंडळी हळहळली. "बाप रे! नसती पीडा झाली च्यामायला त्या घोड्यांपायी, काय हो?" "हो ना - कदाचित," शेतकरी म्हणाला.   दरम्यान त्या प्रदेशातील राजकीय परिस्थिती पालटत होती. पुढल्या दिवशी रंगरूट (recruitment) अधिकारी गावात दाखल झाले. सर्व धडधाडकट पुरुषां...

Why

Why is it the way it is? The way it is.. the way it is... The way it is, the way it is is why it is the way it is. Why is it so? Nobody knows. Let it unfold. Let it be told. Enough for now to say it is the way it is, the way it is is why it is the way it is.    Click here to listen to the musical rendition!
I play with It It plays with me When you can't tell the player from the plaything, it's love, it's reality

व्येरा पावलवाच्या कवितेवरून:

आठवण दोघांची येते:   तो नसतो तेव्हा वाटतं, आत्ताच दार लोटून गेला की. असेल शेजारच्या खोलीत.   पण ती दाराबाहेर पडली, शेजारच्याच खोलीत असली तरी धाकधूक होते - वाटतं, जगातून नाहीशी झाली की काय!

Prayer to humanity

....Wrong question, sweetheart.  Please, look. A 'why' is the murder of love. 'Why should I..' 'What would I..' 'How could you..' 'Why did you..' 'When did I..' Sigh. ...Wrong questions in love.

चितमपल्लींचा तक्ता

Image

शब्द

Image
  'शब्द'    कमला दास ( Kamala Das / Kamala Surayya / Madhavikutty)     शब्द, शब्द, शब्द! शब्दच शब्द माझ्याभवती... पानांसारखे फुटत राहतात मला! त्यांचं हे आतपासून सावकाश पालवणं कधी थांबेलसं वाटत नाही तरी मी बजावत रहाते स्वतःला, 'जरा जपून! नसती ब्याद आहे ही. अगं, कस-कसली रूपं धारण करतात ते! - सुसाट पायांनी जिथं कचकन् थांबावं अशी रस्ता चिरत गेलेली भेग काय! सुन्न, गुंग करून टाकणाऱ्या लाटांचा समुद्र काय! पेटलेल्या वाऱ्याचा झोत काय नि जिवश्च मित्राचा गळा कापायला शिवशिवणारा सुरा काय!!'   शब्द…..वैताग मेला. तरी फुटतात ते मला, जणू पालवी फुटावी झाडाला. कुठल्याशा गाढ आंतरिक शांतीतून त्यांचं हे उगवत रहाणं कधी थांबेलसं वाटत नाही.        

Magic

She stands ahead. Shoulders slightly curved. Eyes briefly shut. Torso inclined, alert - Presto! There’s breath, and voices.   Her two little arms raise the air - stroking, now chopping, now slaying… Then a fine force; her palms close and Oh! Where did the voices go??      

आपण घडवतो जे जे घडतं ते, असं मानायचं ठरवलं तर:

आपण घडवतो जे जे घडतं ते, असं मानायचं ठरवलं तर:   तू मला येऊ देतेस. मी तुला मला येववू देते इतकंच --  अन् मला रोखण्यापासून मी तुला रोखत नाही हे ही.

फिर छिड़ी बात...

Image
बाज़ार  (१९८२) चित्रपटातील मख़दूम मुहिउद्दीन लिखित फिर छिड़ी रात बात फूलों की   ही गज़ल मलाही आवडते. मूळ गज़लेत आणखी काही शेर आहेत. पण चित्रपटात घेतलेल्या शेरांत...फारशी मजा नाही. एके संध्याकाळी मी उर्दू, हिंदी शब्दकोश काढून बसले. म्हटलं, बघू या जमतं का. गाताना शब्दांची ख़ुमारी चढली पाहिजे. जे शेर मला फारसे भावले नव्हते त्यांची पुनर्रचना केली. चित्रपटात घेतलेले शेर व त्यांत मी केलेले बदल खाली देत आहे:     चित्रपटातील गज़ल    फिर छिड़ी रात बात फूलों की रात है या बरात फूलों की | फूल के हार फूल के गजरे शाम फूलों की रात फूलों की | आप का साथ, साथ फूलों का आप की बात बात फूलों की | फूल खिलते रहेंगे दुनिया में रोज़ निकलेगी बात फूलों की | नज़रें मिलती हैं जाम मिलते हैं मिल रही है हयात फूलों की | ये महकती हुई ग़ज़ल 'मख़दूम' जैसे सहरा में रात फूलों की |         बदललेले शेर फिर छिड़ी रात बात फूलों की रात है या बरात फूलों की |   फूलों से हाथ फूलों से गजरे है बदन या ख़िमार फूलों की |    आप का साथ, साथ फूलों का हिनाबंदी हो शाज़ फूलों की ...

नातेसंबंधांत प्रतिमा-निर्मिती

Image
 आपले परस्परसंबंध - कितीही दूरचे वा निकटचे असोत - या संबंधित्वाचा पुरा अर्थ उमगायचा, तर मेंदू प्रतिमा-निर्मिती का करतो हे समजावून घ्यायला हवं, यावर चिंतन व्हायला हवं. आपण स्वतःबद्दल, इतरांबद्दल मनात प्रतिमा, दृढचित्रं का बाळगतो? स्विस, ब्रिटिश, फ्रेंच इ. म्हणून जर तुमची एक प्रतिमा असेल - या प्रतिमांमुळे आपलं मानवतेबद्दलचं अवलोकन दूषित होतंच, शिवाय त्या माणसा-माणसात फूट पाडतात, नाही का? आणि जिथे विभक्तता, भेदाभेद असेल तिथे संघर्ष उद्भवणारच. प्रतिमा निर्माणच न करणं मुळी शक्य आहे का? - येतंय लक्षात? घडल्या घटनांची नोंद न ठेवणं - प्रसंग आनंदाचा असो, दुःखाचा असो - त्याचा हिशेब न ठेवणं. निंदा, अपमान, स्तुती.. प्रोत्साहन मिळो वा उत्साहभंग होवो... कळतंय? आपल्या दैनंदिन नातेसंबंधांत हे सारं घडत असतं - त्याची नोंद, त्याची गणती न करणं शक्य आहे का? मेंदू जर स्वतःबाबत घडणाऱ्या हरेक गोष्टीची मनोवैचारिक नोंद ठेवत बसला, तर त्याला निवण्याची, शांतवण्याची फुरसत कधीच लाभत नाही; तो  निरावेग, निशांत होऊच शकत नाही. अहोरात्र घरघरणारी यंत्रणा अखेर झिजून जाते, शिणून जाते - सहाजिक आहे. नातेसंबंधांत नेमक...

मृत्यूशय्येवर... (नाटुकले)

* * हे भाषांतर माझे नाही * *     मृत्यूशय्येवर...    मूळ जर्मन लेखिका: मार्टिना बेरानेक   (एक म्हातारा, मरणासन्न शेतकरी. कुटुंबातील सारेजण त्याच्या शय्येभवती जमलेत. त्याच्या पायांच्या दिशेला प्रार्थनेनंतर लावून ठेवलेली मेणबत्ती जळते आहे.) शेतकरी (आवाजात घरघर): मेरी! मेरी, कुठे आहेस तू? मेरी : मी इथेच आहे तुझ्यापाशी. शेतकरी : एलिसा, पोरी, तूसुद्धा आहेस का गं? एलिसा: होय पपा, ही मी इथे आहे. (अशातऱ्हेनं शेतकरी घरातल्या सगळ्या माणसांना - सात मुलं, मोलकरीण, घरगडी - हाका मारून तोच-तो प्रश्न विचारतो. सगळ्यांची उत्तरं आल्यावर ताडकन् उठून बसतो.)   शेतकरी : सगळे इथे आहेत?? मग कामाचं कोण बघतंय?!   मेरी (त्याला झोपवत): असं काय करतोस! या घडीला आम्ही तुझ्याचजवळ असायला हवं की नाही? शेतकरी : छे ,छे. काही गरज नाही. तुमची गरज आहे तिथे शेतावर. मेरी : ठीक आहे. चला, सगळे आपापल्या कामाला जा. (सगळे निघून जातात. फक्त मेरी उरते.) शेतकरी : आता मी अतिशय थोड्या वेळेचा सोबती आहे. मेरी, आता तरी खरं खरं सांग. आपल्या मुलांपैकी तो लाल केसांचा बेपेर्ल, तो काही तुला माझ्यापासून झालेला ...

म्हातारचळ (नाटुकले)

* * हे भाषांतर माझे नाही. * *     म्हातारचळ मूळ जर्मन लेखक: फ्रीडरिष कार्ल वेश्टर (Friedrich Karl Waechter) (म्हाताऱ्यांचा घोळका टेबलाभवती बसून बीअर पीत आहे. शांतता. अकस्मात् एकजण उठून उभा राहतो व पेला उंचावतो-)  म्हातारा: म्हातारचळ झिंदाबाद! सर्व म्हातारे (पेला उंचावत): झिंदाबाद! झिंदाबाद! (सर्वजण एका दमात पेला रिचवतात. काही खाली बसतात. एक-दोघे कोसळतात, मरून पडतात. उर्वरित पुन्हा एकमेकांचे पेले भरतात. पुन्हा एकजण उठतो, पुन्हा सारे ‘म्हातारचळ झिंदाबाद!’चा घोष करतात.  पुन्हा काहीजण खुर्चीत बसतात, काही मरतात. अखेर एकच म्हातारा उरतो. तो पेला उंचावत उभा राहण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली कोसळतो.)

संभ्रम व खात्री

Image
 संभ्रम (confusion) ही एक मोठी संधी आहे. कधीच संभ्रमात न पडणारे लोक मोठ्याच समस्येत असतात - 'आपल्याला सारंकाही माहित आहे' असं ज्यांना वाटतं त्यांना खरं पाहता काहीच माहित नसतं. 'आपल्याला सारंकाही स्पष्ट आहे' असं ज्यांना वाटतंं, ते खरं म्हणजे संकटात असतात. त्यांची स्पष्टता उथळ असते. ते जिला 'स्पष्टता' म्हणतात तो निव्वळ मूर्खपणा असतो. मूर्ख माणसं फारच ठाम असतात. याचाच अर्थ संभ्रम निर्माण होण्यासाठी आवश्यक तेवढी बुद्धिमत्ता त्यांच्यापाशी नसते.  होय, संभ्रमात पडण्यासाठीही बुद्धिमत्ता लागते. बुद्धिमान माणूसच घोर संभ्रमावस्था अनुभवू शकताे. इतर लोक पुढे-पुढे जात रहातात, हसतात-खिदळतात, पैसा जमवतात, सत्ता व प्रसिद्धीसाठी ओढाताण करत राहतात... केवढा आत्मविश्वास असतो ना त्यांच्या अंगी! ती आनंदीसुद्धा भासतात.  तुम्ही संभ्रमात, गोंधळात पडलेले असाल, तर त्यांच्याकडे पाहून तुम्हाला नाही म्हटलं तरी थोडा मत्सर वाटतो: 'आयुष्याबद्दल या लोकांना किती स्पष्टता आहे! त्यांच्यापुढे दिशा आहे, उद्दिष्ट आहे, लक्ष्य कसं गाठायचं ते त्यांना ठावूक आहे, जमतंही आहे! जणू ते एकेक पायरी चढत वर चाल...

बिल गन - उद्गार

Image
तत्त्वज्ञान हा तुरुंग असतो. तुमच्याबद्दलच्या अघळपघळ, तऱ्हेवाईक गोष्टींना त्यात थारा नसतो.  व्यक्तीच्या विचारप्रक्रियेची निष्पत्ती काय, हे ती प्रक्रियाच जाणे!  माणसाला शिकवण्याची भारी खाज असते. त्यामुळे शिकण्याची सहजप्रवृत्ति नष्ट होते.  दर्यावर्दी ताऱ्यांकडून शिकतो. तारे काहीही शिकवत नाहीत. सूर्य आपलं अंतःकरण खुलं करतो, व फुलापानांवर प्रकाशाचा वर्षाव करतो.  वाचणाऱ्याची नजर पुस्तकाच्या पानांना लाज आणते. संकेतांमुळे कल्पनेचा सत्यानाश होतो. आसक्तीपुढे गर्वही वरमून जातो. तुम्ही पृथ्वीवरील अवमानित आहात. जणू वाळवंटात पाण्यासारखे आहात.  जगाचे लाडके होणं म्हणजे यशाची प्रतीकं होणं. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही यशस्वी होता कामा नये, कारण जगणं अंतहीन आहे.    तुम्ही फुलाइतके अनामिक आहात. व्हीनसचा पुत्र आहात. निसर्गतः वासना हेच व्हीनसचं वात्सल्य असतं. तुमच्या बेंबीभवती तिची जीभ फिरेल, पण त्यात वावगं वाटून घेऊ नका, कारण प्रेमाविना जगात आहेच काय?  तुम्ही प्रेमाच्या रक्षणार्थ कामी येणारा दारुगोळा आहात!     - बिल गन , त्याने दिग्दर्शित केलेल्या ' गांजा अ...

पवित्र सावली

सूफी कथा आहे: कोण्या एके काळी एक अत्यंत सदाचारी व्यक्ती होती. आपण तिला 'साधू' म्हणू. हा साधू इतका निर्मळ होता, की एखादा मानव इतका नितळ, इतका सच्चा कसा असू शकतो, यावर आश्चर्य करीत आकाशातील देवदूतसुद्धा त्याला कौतुकाने न्याहाळत. ताऱ्यांचा प्रकाश सांडावा, फुलांचा गंध पसरावा तितक्या स्वाभाविकपणे साधूच्या दैनंदिन जगण्यातून सदाचार पाझरत असे. त्याला याची किंचितही जाणीव नव्हती. त्याच्या रोजच्या व्यवहाराचं वर्णन दोनच शब्दांत करता येईल - दया व क्षमा. पण त्याच्या तोंडून या शब्दांचा उच्चारदेखील झाला नसेल. त्याच्या सहज हास्यातून, करुणामय, सहनशील, उदार वर्तनातूनच ते शब्द प्रतीत होत असत. देवदूतांनी देवाला गळ घातली, "देवा, या माणसाला चमत्काराचं वरदान द्या ना." देव हसून म्हणाला, "असं कसं! त्याला काय पाहिजे, ते आधी त्याला विचारायला नको?"   देवदूत साधूच्या स्वप्नात प्रकटले. "आपण फार फार सज्जन आहात. केवळ स्पर्शाने रोगी-आजारी मंडळींच्या व्याधी दूर करण्याची किमया आपल्याला साधली, तर आपणास ते आवडेल का?"   "कशाला? ते देवाच्या हातांत आहे. ती त्याची कृपा आहे."   ...

नागरिकांनी खासकरून पुढील प्रकारच्या व्यक्तीपासून अत्यंत सावध असावं:

Image
....साहस, धडाडी, बुद्धिमत्ता आदी प्रभावी गुणांनी युक्त मनुष्य त्या गुणांचा वापर केवळ स्वार्थसाधनेसाठी करत असेल; त्याच्या वर्तनात जर इतरांच्या हक्कांप्रती निर्मम अनास्था झळकत असेल, तर याची परिणती तो मनुष्य अधिकाधिक नीच, पापी होण्यात झाल्याखेरीज रहात नाही. एखादा समाज या गुणांची पूजा करत असेल; गुणांचा वापर योग्यरित्या केला जातो अथवा नाही हे न लक्षात घेताच गुणीजनांचा उदोउदो करत असेल, तर त्यातून त्या समाजाची कृपणबुद्धी, अविवेक दिसून येतो. ....निव्वळ कर्तृत्वावरून, संपादित केलेल्या यशावरून एखाद्या व्यक्तीची पारख करण्यासारखी भीषण चूक दुसरी नाही. जर लोक माणसांचं मूल्यमापन सर्रास यापद्धतीने करत असतील; दुष्ट मनुष्याची सरशी होतेय म्हणून दुष्टवृत्तीला मोकळीक देत असतील, तर 'स्वायत्त संस्थांची भिस्त ही अखेर नागरिकत्वाच्या निष्कलंतेवर असते' हे सत्य समजावून घेण्यास सदर लोक अक्षम असल्याचं स्पष्ट दिसून येतं. दुष्टाईची खुशामत करणारे लोक हे 'आपण स्वातंत्र्याकरता ना-लायक असल्याचं' सिद्ध करतात. ....प्रजासत्ताकातील नागरिकांनी खासकरून पुढील प्रकारच्या व्यक्तीपासून अत्यंत सावध असावं: 'प्रजा...

हेतूची शुद्धी

Image
सत्याचा शोध घ्यायचा आहे? मग आपल्या अंगी दोन गोष्टी हव्यात: एक हेतूची शुद्धी आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रामाण्यावाचून जगण्याची हिंमत. आपल्याला नेमकं काय हवं आहे ते मनुष्याला बहुतेकदा कळत नाही. अनेक दिशांनी मनुष्य धावपळ करतो, पण काय मिळालं म्हणजे आतून शांत वाटेल, समाधान वाटेल, तृप्ती येईल.. कळतच नाही.    आपल्याला मार्गदर्शक, गुरु हवा असतो, तो तरी कशासाठी? ...आपल्यासाठी काय हितकर आहे हे सांगणारा हवा आहे का कुणी? आपल्या विचार, भावना, इच्छांना संमती देईल असा कुणी हवा आहे? आशीर्वाद देणारा कुणी हवा आहे? करमत नसेल, कंटाळा येईल तेव्हा ज्याच्यापाशी जाऊन बसता येईल असा कुणी मनुष्य हवा आहे का? जुन्या नातेसंबंधांना मन विटलं आहे, तर नव्या प्रकारचा संबंध म्हणून गुरु हवा का? ..पण त्यानं सांगितलेलं आपल्याला पटलं नाही तर! आपल्या मनाला, अहं ला रुचलं नाही तर! तर काय करायचं? त्याच्या शब्दांची, वचनांची मोडतोड करायची, विपर्यास करायचा? आपल्या सोयीप्रमाणे वाकवून मग ते ग्रहण करायचे?   काय हवंय काय? मानसिक संरक्षण हवं आहे का? आपण आहोत तसे स्वीकारणारा हवा आहे का कोणी?   ...ही स्वतःची जी ओळख आह...

धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे

Image
समाजव्यवस्था आकारास येत गेल्या तसे एकामागून एक ढाचे निर्माण होत गेले - राजकीय ढाचे, आर्थिक ढाचे, शैक्षणिक ढाचे...अनेकानेक structures.  यातून संस्कृती आकारास येत गेल्या. जीवनात आपण प्राप्तीची क्षेत्रं निर्माण केली व धर्मालाही प्राप्तीच्या क्षेत्रातच घालून मोकळे झालो. ज्याप्रमाणे आम्ही घर बांधतो, दुकान थाटतो त्याप्रमाणे ही सृष्टी बनवणारादेखील कोणीतरी असला पाहिजे असं आम्हीच ठरवून टाकलं व साक्षात् ईश्वराला जन्माला घातलं.    या ईश्वराचे गुणदेखील आम्ही निश्चित केले: तो नेहेमी न्याय करेल, अन्याय करणार नाही, तो प्रेम करेल, क्षमा करेल, पुण्याला इनाम देईल, पापाला शिक्षा देईल, मृत्यूपश्चात आम्हाला स्वर्ग-नरक देईल वगैरे सगळं आम्ही ठरवून टाकलं. ‘ईश्वर’ नावाचं एक अधिकारस्थान, एक authority निर्माण केली. बिचारा ईश्वर, त्याला नकार देण्याची सोय नव्हती, कारण आमच्या त्या बापाचे बाप आम्ही होतो! आमचा स्वतःवर विश्वास तर नाहीच. ‘आमचे परस्परसंबंध, आमची नीतिमत्ता सगळं आमचं आम्ही पाहून घेऊ’ असं म्हणण्याची हिम्मत आमच्यात नाही. आम्हाला प्रत्येक ठिकाणी डोक्यावर बसणारी अधिकारी मंडळी पाहिजेत. बनावट ईश्व...

कर्म हेच फळ

Image
जोपर्यंत कर्म हाच आनंद बनत नाही, जोपर्यंत कर्माच्या बाहेर काहीतरी, कोठूनतरी, कसलंतरी सुख मिळणार आहे अशी तुमची भ्रांती राहील, तोपर्यंत दुःखच दुःख तुमच्या वाट्याला येणार आहे. वास्तविक आपल्या कर्मात, आपल्या आत्म-अभिव्यक्तीत तुम्हाला तृप्ती का वाटू नये? समाधान का मिळू नये? 'मला जगण्याची संधी मिळाली अन् मी जगलो, परिणामांची, फळाची तमा न बाळगता जगलो' - असं असेल तर मनुष्याला कर्म करण्यात आनंद होईल. आनंदासाठी परिणामांची प्रतिक्षा करावी लागत नाही, 'पुढं काय होतं पाहू' असं म्हणावं लागत नाही. आत्ता मी जे केलं, इथे मी जे केलं त्यातच मी तृप्त झालो, संतुष्ट झालो. ..कर्म करावं अन् तेवढ्यापुरतं मरून जावं! खरंच, प्रत्यक्ष मरणघटका येण्याची वाट का पहावी माणसानं? एकेक कर्म करीत जावं, तिथंच पूर्णतृप्ती साधावी, परिणामांना म्हणजे सुखदुःखांना तिलांजली द्यावी, त्यांच्या स्मृती साठवत, उगाळत बसू नये. जे व्हायचं होतं ते झालं, जेवढं करता येण्यासारखं होतं तेवढं केलं. विषय संपला!   सुख झालं, दुःख झालं; हसू आलं किंवा रडू आलं म्हणून काय बिघडलं? काय हरकत आहे? पण तुम्ही ती गोष्ट तिथेच संपू देत नाही, विरून...

दीक्षा

Image
* हे भाषांतर माझं नाही.*     ...आपला भूतकाळ सोडून देण्याची तयारी म्हणजे दीक्षा. माझं अस्तित्व म्हणजे माझा भूतकाळ नव्हे, भविष्यकाळदेखील नव्हे, अस्तित्व म्हणजे केवळ वर्तमान हे पूर्णतः उमजून घेण्याची तयारी म्हणजे दीक्षा.    यजुर्वेदातील एका सूत्राची सुरुवात 'व्रतेनं दीक्षां आप्नोति...' अशी होते. म्हणजे व्रतातून म्हणे दीक्षा येते. छे! व्रताचा दीक्षेशी कसलाही संबध नाही.  व्रत म्हणजे खरंतर आत्म-अनुशासित जीवन. व्रतातून दीक्षा कशी येईल? दीक्षेविना व्रत येईल कसं?    व्रत म्हणजे शपथा वगैरे नव्हेत. उदा. जो माणूस खरं बोलण्याचं व्रत घेतो, तो आपल्या अंगी खोटं बोलण्याची प्रबळ ऊर्मी असल्याचीच घोषणा करत असतो. अंतरंगी असलेल्या खोट्याच्या आकर्षणानं तो घाबरून गेलेला असतो. खोटं बोलण्याची प्रवृत्ती दाबून टाकण्याचे आडदांड प्रयत्न करून पाहतो - ते असफल ठरतात. मग तो गर्दीसमोर, धर्मोपदेशकांसमोर, जाहीररित्या शपथ घेतो, व्रत घेतो: 'मी खरं बोलेन'.  लोकांसमोर व्रत घेतलं आहे, तेव्हा व्रताचा भंग करणं म्हणजे समाजाला आपल्याप्रती असलेला आदर गमावून बसणं. असली व्रतं ही अहंकाराची अभिव्य...

विचार मौलिक (original) असतच नाहीत, अनुभूती मौलिक असते

Image
* हे भाषांतर माझं नाही.*   प्रश्न: एकीकडे आपण गीता, बायबल, कुराण आदी धर्मग्रंथांद्वारे प्रतिपादित धर्म मानत नाही. मग त्यांचे विचार का म्हणून चोरता?   रजनीश (ओशो) : ...काही दिवसांपूर्वी जे. कृष्णमूर्तींच्या एका अनुयायाचं पत्रं आलं. माझ्या विचारांमध्ये कृष्णमूर्तींच्या विचारांची झलक दिसते असं त्याचं म्हणणं आहे. स्वाभाविक आहे. पण हेदेखील लक्षात घ्या, की कृष्णमूर्तींच्या बोलण्यात बुद्धाची झलक आहे, लाओ त्सूची झलक आहे, उपनिषदांची छाप आहे. त्यांच्या विचारांमध्ये झेन गुरुंची पुनरुक्ति आहे. याचा अर्थ 'कृष्णमूर्तींनी उपनिषदांतून विचार चोरले' असा घ्यावा का? - नाही, तसं म्हणणं चुकीचं ठरेल. माझी तर अशी धारणा आहे, की विचार मौलिक असतच नाहीत. भाषा मौलिक असतच नाही. 'मौलिक' (original) या शब्दाचा अर्थ समजावून घ्या. 'मौलिक' म्हणजे मुळापासून, उगमापासून, स्रोतापासून आलेलं. शब्द मौलिक नाहीत, ते शतकानुशतकांच्या परंपरेतून आलेले आहेत. पण शब्दांचा वापर करावा लागतो, बोलावं तर भाषेतच लागतं! त्याला इलाज नाही. दुर्दैव असं, की भाषेची वस्त्र चढवू लागताच अनुभूती गायब होते, लुप्त होते.  ज्याला ख...

सहजता, संघर्षमुक्तता

Image
सहजता ही मनोवैचारिक गोष्ट नव्हे. मुद्दामहून अंगी बाणवलेली सहजता, साधेपणा म्हणजे निव्वळ धूर्तपणे केलेली तडजोड असते, सुख-दुःखाच्या भोगापासून बचाव व्हावा यासाठी ती केली जाते.  ही स्वतःला स्वतःतच कोंडून घेण्याची क्रिया असते, आणि हीतून नानातऱ्हेचे संघर्ष, संभ्रम उद्भवतात.   संघर्षमुक्त होण्यातून सहजता येते, संघर्षावर मात करण्यातून नव्हे. एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवावा लागतोय याचाच अर्थ ती पुन्हा पुन्हा नियंत्रणाखाली आणावी लागतेय. मग संघर्ष निरंतर चालूच राहणार. संघर्षाचं आकलन करून घेणं म्हणजे इच्छा, वासनेचं आकलन करून घेणं.     निरीक्षणकर्ता व निरीक्षित केली जाणारी एखादी गोष्ट, यांची जी प्रक्रिया असते तीत द्वैत नसतं, ती अखंड प्रक्रिया असते. या प्रक्रियेच्या एकात्म वास्तवाची अनुभूती आली तरच वासना, कलहांतून मुक्तता होते. 'हे वास्तव कसं बरं अनुभवता येईल?' असा प्रश्न विचारून उपयोग नाही. ते स्वाभाविकपणे घडून यायला हवं. दक्षता, अक्रिय, ग्रहणशील सजगता असेल तेव्हाच ते घडून येईल. ...खोलीत बसल्या बसल्या, कल्पनारंजन करून विषारी सापाला सामोरं जाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार नाही. खर...

-

Image
 *कलाकृतीबद्दल बोलताना कोणाचाही रसभंग व्हावा असा हेतू नसतो पण दुर्दैवाने तो होऊ शकतो.*   जगता जगता मनाचा पट किती नरमलाय! दिसामाजी दोन वेळा मेजावरून कपडा फिरावा तसा हजारो दिवस-रात्रींशी, देहाशी लाग-लागून तो थकलाय, विरलाय. आडपडदा राखणं आता शक्य नाही - गरजच उरली नाही. या खोलीत येणं, करकरत्या फळ्यांवर चालणं.. शिकणं किती सहज झालंय नै आज? शिकवण्यातदेखील आता अवघडलेपण नाही. हा आपला पहिला वर्ग, पहिला पाठ. ...कित्येक वर्षांपूर्वी, तरुणपणी जे शिकून गेलास ते शिकणं नव्हतं मुळी. 'संगीत' हे तुझ्याकरता कुणीतरी बनण्याचं साधन होतं, 'संगीताचा विद्यार्थी' बनून माझ्यापाशी आला होतास. त्यात तुला गती होतीच. शिकणं औपचारिक, मोहोर उमटवून घेण्यासाठी. ..वयात येताना तडकलेल्या आवाजाचं न्यून वाद्याच्या सहाय्यानं भरायचं होतं. पिढीजात चांभारकी, कळकट 'गावंढळ' आयुष्य दूर ढकलण्यासाठी सुरांचं बळ तुला हवं होतं. गांभिर्याचा आवेश होता. संगीताबद्दल गांभिर्य होतं, नाही असं नाही. माझे धुळीत थुंकल्यासारखे बाष्कळात बाष्कळ शब्ददेखील वेचून घेतले असतेस तू तेव्हा.  आणि मी? ..संगीतापासून एक दरवाजा निर्माण केला ह...

Little business with truth

Image