Posts

Showing posts from April, 2021

संभ्रम व खात्री

Image
 संभ्रम (confusion) ही एक मोठी संधी आहे. कधीच संभ्रमात न पडणारे लोक मोठ्याच समस्येत असतात - 'आपल्याला सारंकाही माहित आहे' असं ज्यांना वाटतं त्यांना खरं पाहता काहीच माहित नसतं. 'आपल्याला सारंकाही स्पष्ट आहे' असं ज्यांना वाटतंं, ते खरं म्हणजे संकटात असतात. त्यांची स्पष्टता उथळ असते. ते जिला 'स्पष्टता' म्हणतात तो निव्वळ मूर्खपणा असतो. मूर्ख माणसं फारच ठाम असतात. याचाच अर्थ संभ्रम निर्माण होण्यासाठी आवश्यक तेवढी बुद्धिमत्ता त्यांच्यापाशी नसते.  होय, संभ्रमात पडण्यासाठीही बुद्धिमत्ता लागते. बुद्धिमान माणूसच घोर संभ्रमावस्था अनुभवू शकताे. इतर लोक पुढे-पुढे जात रहातात, हसतात-खिदळतात, पैसा जमवतात, सत्ता व प्रसिद्धीसाठी ओढाताण करत राहतात... केवढा आत्मविश्वास असतो ना त्यांच्या अंगी! ती आनंदीसुद्धा भासतात.  तुम्ही संभ्रमात, गोंधळात पडलेले असाल, तर त्यांच्याकडे पाहून तुम्हाला नाही म्हटलं तरी थोडा मत्सर वाटतो: 'आयुष्याबद्दल या लोकांना किती स्पष्टता आहे! त्यांच्यापुढे दिशा आहे, उद्दिष्ट आहे, लक्ष्य कसं गाठायचं ते त्यांना ठावूक आहे, जमतंही आहे! जणू ते एकेक पायरी चढत वर चाल...

बिल गन - उद्गार

Image
तत्त्वज्ञान हा तुरुंग असतो. तुमच्याबद्दलच्या अघळपघळ, तऱ्हेवाईक गोष्टींना त्यात थारा नसतो.  व्यक्तीच्या विचारप्रक्रियेची निष्पत्ती काय, हे ती प्रक्रियाच जाणे!  माणसाला शिकवण्याची भारी खाज असते. त्यामुळे शिकण्याची सहजप्रवृत्ति नष्ट होते.  दर्यावर्दी ताऱ्यांकडून शिकतो. तारे काहीही शिकवत नाहीत. सूर्य आपलं अंतःकरण खुलं करतो, व फुलापानांवर प्रकाशाचा वर्षाव करतो.  वाचणाऱ्याची नजर पुस्तकाच्या पानांना लाज आणते. संकेतांमुळे कल्पनेचा सत्यानाश होतो. आसक्तीपुढे गर्वही वरमून जातो. तुम्ही पृथ्वीवरील अवमानित आहात. जणू वाळवंटात पाण्यासारखे आहात.  जगाचे लाडके होणं म्हणजे यशाची प्रतीकं होणं. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही यशस्वी होता कामा नये, कारण जगणं अंतहीन आहे.    तुम्ही फुलाइतके अनामिक आहात. व्हीनसचा पुत्र आहात. निसर्गतः वासना हेच व्हीनसचं वात्सल्य असतं. तुमच्या बेंबीभवती तिची जीभ फिरेल, पण त्यात वावगं वाटून घेऊ नका, कारण प्रेमाविना जगात आहेच काय?  तुम्ही प्रेमाच्या रक्षणार्थ कामी येणारा दारुगोळा आहात!     - बिल गन , त्याने दिग्दर्शित केलेल्या ' गांजा अ...

पवित्र सावली

सूफी कथा आहे: कोण्या एके काळी एक अत्यंत सदाचारी व्यक्ती होती. आपण तिला 'साधू' म्हणू. हा साधू इतका निर्मळ होता, की एखादा मानव इतका नितळ, इतका सच्चा कसा असू शकतो, यावर आश्चर्य करीत आकाशातील देवदूतसुद्धा त्याला कौतुकाने न्याहाळत. ताऱ्यांचा प्रकाश सांडावा, फुलांचा गंध पसरावा तितक्या स्वाभाविकपणे साधूच्या दैनंदिन जगण्यातून सदाचार पाझरत असे. त्याला याची किंचितही जाणीव नव्हती. त्याच्या रोजच्या व्यवहाराचं वर्णन दोनच शब्दांत करता येईल - दया व क्षमा. पण त्याच्या तोंडून या शब्दांचा उच्चारदेखील झाला नसेल. त्याच्या सहज हास्यातून, करुणामय, सहनशील, उदार वर्तनातूनच ते शब्द प्रतीत होत असत. देवदूतांनी देवाला गळ घातली, "देवा, या माणसाला चमत्काराचं वरदान द्या ना." देव हसून म्हणाला, "असं कसं! त्याला काय पाहिजे, ते आधी त्याला विचारायला नको?"   देवदूत साधूच्या स्वप्नात प्रकटले. "आपण फार फार सज्जन आहात. केवळ स्पर्शाने रोगी-आजारी मंडळींच्या व्याधी दूर करण्याची किमया आपल्याला साधली, तर आपणास ते आवडेल का?"   "कशाला? ते देवाच्या हातांत आहे. ती त्याची कृपा आहे."   ...

नागरिकांनी खासकरून पुढील प्रकारच्या व्यक्तीपासून अत्यंत सावध असावं:

Image
....साहस, धडाडी, बुद्धिमत्ता आदी प्रभावी गुणांनी युक्त मनुष्य त्या गुणांचा वापर केवळ स्वार्थसाधनेसाठी करत असेल; त्याच्या वर्तनात जर इतरांच्या हक्कांप्रती निर्मम अनास्था झळकत असेल, तर याची परिणती तो मनुष्य अधिकाधिक नीच, पापी होण्यात झाल्याखेरीज रहात नाही. एखादा समाज या गुणांची पूजा करत असेल; गुणांचा वापर योग्यरित्या केला जातो अथवा नाही हे न लक्षात घेताच गुणीजनांचा उदोउदो करत असेल, तर त्यातून त्या समाजाची कृपणबुद्धी, अविवेक दिसून येतो. ....निव्वळ कर्तृत्वावरून, संपादित केलेल्या यशावरून एखाद्या व्यक्तीची पारख करण्यासारखी भीषण चूक दुसरी नाही. जर लोक माणसांचं मूल्यमापन सर्रास यापद्धतीने करत असतील; दुष्ट मनुष्याची सरशी होतेय म्हणून दुष्टवृत्तीला मोकळीक देत असतील, तर 'स्वायत्त संस्थांची भिस्त ही अखेर नागरिकत्वाच्या निष्कलंतेवर असते' हे सत्य समजावून घेण्यास सदर लोक अक्षम असल्याचं स्पष्ट दिसून येतं. दुष्टाईची खुशामत करणारे लोक हे 'आपण स्वातंत्र्याकरता ना-लायक असल्याचं' सिद्ध करतात. ....प्रजासत्ताकातील नागरिकांनी खासकरून पुढील प्रकारच्या व्यक्तीपासून अत्यंत सावध असावं: 'प्रजा...