Posts

Showing posts from 2020

सुहाना सा कोहरा छाया रहता था उन दिनों

 मूल मराठी काव्य: श्वेता पाटोळे(ले)   सुहाना सा कोहरा छाया रहता था उन दिनों हमारें दरमियाँ | नाम-पता-रंग-ढंग की जब कोई संभावना न थी... आपस में पाए चंद निशानों से लिपटा कोहरा | उम्मीदभरा, दिलचस्प, गुलाबी, गहरा, बेकरार-सा, दिलकश... 'मेरेपन'की, 'तुम्हारेपन'की  सारीं परिधिओं को समा लेने वाला; जाने पहचाने से भुलावों में ला कर हठात् अनजान बन जाने वाला; कुछ कुछ समझा सा लगने पर उलझने-उलझाने वाला | अज्ञात के साथ चलते  चल रही खुद की तलाश | नए सिरे से हो रहा खुद का परिचय | शायद तुम मौजूद थे उस तलाश में या एहसास था बस, तुम्हारे मौजूदगी का | तुमने भी नए सिरे से पाया खुद को, शायद, मेरे मौजूदगी के एहसास में |   फिर न जाने कब, किस पल से तुम्हारा परिचय खुद के परिचय से ज्यादा ज़रूरी हो बैठा..? क्यों सब कुछ आज़माया, लाख कोशिशें की इस परिचय को पाने की?   हम्म..?   ..आखिरकार हमारी जान-पहचान हो गई | पर ठीक उसी वक़्त छट गया,  पिघल गया वो कोहरा | पाएं जा सकते थे जो रुख़ नए - गुम गए, कोहरे की ही तरह... आज भी हम साथ चल रहें हैं, पर अब कोई प्रत्याशा नहीं, दिल में कोई हल...

राहें

  राहें   मूल मराठी काव्य: पद्मा गोळे(ले)      खोयी हुईं राहें भटकी हुईं राहें रायज सी राहें पहलीं थाम लेती है एक हाथ तो दूसरीं, दूसरा और कहती हैं तीसरीं खींचकर पाँव, 'बस अब यहीं पड़ जाव' |

तुमपर लिखी कविताएं

 तुमपर लिखी कविताएं   मूल मराठी काव्य: संदीप खरे     मेरा घर, तुम्हारा घर माना अलग अलग शहरों में दोनों अलग अलग देशों में बसे हैं | फिर भी नक़्शे में सही उन्हें जोड़नेवाली काल्पनिक रेखाएं खींची जा सकती है न? इन्हीं रेखाओं को मैं 'तुमपर लिखी कविताएं' कहता हूँ |

Why not read the tree firsthand?

 Originally written in Marathi by Vasant Abaji Dahake   To cut a tree To make logs To chop them into flakes To pulp, press and mould them into paper Upon which to write, or print Thereafter to read ... Why so much ado? Why not read the tree firsthand?

सातवां

  सातवां   मूल मराठी काव्य: वि. वा. शिरवाडकर 'कुसुमाग्रज'     चम्मच-धानी में सात चम्मच टंगे थें | एक रोज़ एक चम्मच न जाने कहाँ खो गया | बचे छहों के गलों से सहसा बेरोक सिसकी फूटी | "वो होती तो", सुबकते हुए वे बोलें, "वह न खोता" |  न जाने कैसे काबू खो कर मैॆ सातवां चम्मच बन गया, उसकी ख़ाली जगह ले कर   छहों की सिसकनों में शरीक हुआ और बुदबुदा गया: "सच कहा दोस्तों, वो होती तो मैं न खोता"|

Rendez-vous

Run through the hall - Off with the office call! - If the door is away, take the nearest wall. Run down the stairs, Run down the street, Listen to the silent night and to your heavy feet. Rush to the station, run! Catch a train, Let some gloomy faces, places run through your brain. Run out of battery, Make way through the crowd, In the face of this city Shout my name loud!

La première balade

<< Comme la lune est pleine, tu la vois, toi?>> il dit. <<Ooh! Fais attention mon ami,>>  il hèle le moto qui nous frôle. Je plonge ma tête dans le dos fort Rêves venté, j'en veux encore.

दाढेचं उच्चाटन

दुःखाला चेहरा माझा अर्धाच दिला म्हटले अर्धा कोराच राहू दे बाजूला एकट्याने जेव्हा करमणार नाही सुख येईल शेजारी - तेवढीच सोबत तुला.

बापानं आपल्यासाठी आयुष्य खर्ची घातलं, आज्ज्यानं बापासाठी... मग जगलं कोण?

Image
प्रश्न : ...काही माणसं स्वतःच्या, आपल्या मुलाबाळांच्या व त्यापुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झटत आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?...एक चांगलं विश्व, चांगला भवताल घडवण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व समूहांबद्दल मी बोलतो आहे - 'ग्रीनपीस', शांतता चळवळी वगैरे. रजनीश (ओशो) : आलं लक्षात. पण तुमच्या हे लक्षात येतंय का, की गेली हजारो वर्षं प्रत्येक पिढी अगदी तेच करत असल्याचा दावा करतेय. आपल्या मागच्या पिढीनं आपला विचार केला, त्यांना आपलं भविष्य उजळून टाकायचं होतं – प्रत्यक्षात काय घडलं? शतकानुशतकं प्रत्येक आई, प्रत्येक बाप, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक धर्माचरणी व्यक्ती हेच करण्यासाठी धडपडते आहे – सगळीजण भविष्य उज्ज्वल करू पहात आहेत, पण त्यातून भलतंच काहीबाही निष्पन्न होतंय. असं का? तर ह्या सर्व भल्या माणसांनी स्वतःचा वर्तमान नासवला, वाया घालवला. त्यांनी मन मारलं, 'त्याग' केला. मंडळी स्वतःला हुतात्मा समजू लागली. 'आपण किती सेवाभावी आहोत, जणू अवघ्या मानवजातीचं पांग फेडतोय' अशा आविर्भावात मनोमन स्वतःची पाठ थोपटू लागली. खरंतर ही माणसं सर्वांचंच मोठं नुकसान  करत ह...

अपत्याला मनोरुग्ण होण्यापासून वाचवलंत तरी रग्गड होईल

Image
 कधीकधी तुम्हाला राग येतो - सुदैवाने अजून तुमचा 'महामानव' झालेला नाही! तुम्हीही रागावू ‘शकता’, आणि तुम्हाला वाटतं यातून माझं मूल काय शिकेल?  - सरळ आहे, ते 'राग' या भावनेबद्दल शिकेल. त्यालाही केव्हातरी रागाबद्दल चार गोष्टी कळून याव्या लागतील ना. मुलं असंच शिकतात - भवतालातून, निरीक्षणातून. तेव्हा राग आला तर रागवा, आणि त्याला रागाबद्दल शिकू द्या. त्याच्यावर प्रेम करा, आणि त्याला प्रेमाबद्दल शिकू द्या; प्रामाणिकतेने वागा, आणि त्यातून ते प्रामाणिकपणा शिकेल. तुम्ही इतकंच करावं, बाकी कश्शाची गरज नाही. उगीच तणावग्रस्त होऊ नका. कधी तुमच्या मुला/मुलीला खर्चाकरता पैसे द्यायची तुमची इच्छा नसेल तर तिला/त्याला खरं ते सांगा: 'मला पैसे द्यावेसे वाटत नाहीत' असं स्पष्ट सांगा. आपण ढोंग करतो. 'पैसे द्यायला हरकत नाही, पण तुझ्या भल्याकरताच मी देत नाही..' वगैरे थापा मारतो आपण. सरळ सांगा, 'मी कंजूष आहे, मी तुला पैसे देऊ इच्छित नाही!' नाही नं तुमची इच्छा, मग नका देऊ! तुमच्याने पैसेही सोडवत नाहीत, नि स्वतःच्या चांगुलपणाची खोटी प्रतिमाही मोडवत नाही. मुलाच्या/मुलीच्या भल्या...

पक्षीकर्ती

Image
*ही मुलाखत मी घेतलेली नाही. एका इंग्रजी वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीतील निवडक अंशांचं हे भाषांतर आहे. सदर मुलाखतीवर, तसेच छायाचित्रांवर स्वामित्व हक्क सांगण्याचा वा तिच्या भाषांतराद्वारे कोणतेही आर्थिक-व्यावसायिक लाभ मिळवण्याचा माझा हेतू नाही.*       ...‘ती’ काय करते? ती पक्षी पाहण्यात रमते, पक्ष्यांच्या प्रतिकृती निर्माण करते. विविध शहरांतील, खेडेगावांतील शाळांमधून, पर्यावरण-उत्सवांमधून वन्यजीव संवर्धनाबद्दल संवाद साधते. ‘पेपर चर्र्प्स’ या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्याला तिच्या कारागिरीची झलक दिसते. मुख्यतः कागद वापरून साकारलेल्या अत्यंत देखण्या, बारकावेयुक्त प्रतिकृती बघताना आपण थक्क होऊन जातो.  दिल्लीस्थित या तरुणीचं नाव आहे निहारिका रजपूत.        तुझ्या पहिल्यावहिल्या पक्षीकृती बद्दल काही सांगशील? २०१६ साली इंग्लंड मधील ‘बर्डर्स अगेन्स्ट वाइल्डलाइफ क्राईम’च्या जनजागृती मोहिमेकरता मी हेन हॅरिअर (Circus cyaneus) प्रजातीच्या हारीण पक्ष्याच्या काही प्रतिकृती बनवल्या. आजघडीला मी ज्या तऱ्हेच्या प्रतिकृती घडवते त्यांची ती सुरुवात म्हणता येईल....

इच्छा आणि क्रोध

Image
रागाचं मानसशास्त्र पहा. आपल्याला काही तरी हवं असतं. कोणीतरी ते प्राप्त करण्यात आपल्याला आडकाठी करतं. कशाचातरी अडथळा निर्माण होतो, काहीतरी आपल्या मार्गात शिळा होऊन उभं ठाकतं. पाहिजे ते हाती येत नाही. ही वैफल्यग्रस्त ऊर्जाच क्रोधाचं रूप घेते. इच्छापूर्तीची शक्यता खुंटवणाऱ्या व्यक्तीचा, वस्तूचा, परिस्थितीचा आपल्याला राग येतो. रागाला प्रतिबंध करता येणार नाही, तो स्वाभाविकपणे उद्भवतो. पण एक गोष्ट ध्यानात घ्या: अतिगांभिर्याने, जीवन-मरणाचा प्रश्न होण्याइतक्या तीव्रतेने कशाचीच इच्छा धरू नका. खेळकर व्हा. इच्छाच करू नका, असं मी म्हणत नाही. तसं करणं म्हणजे स्वतःतलं काहीतरी दाबून टाकण्याचा प्रयत्न. मी म्हणतो, इच्छा खेळकरपणे बाळगा. जर पूर्ण झाली तर चांगलंच आहे. जर पूर्ण झाली नाही, तर कदाचित ती योग्य वेळ नव्हती. जाऊ दे, पुन्हा कधीतरी.  आपण इच्छांशी, अपेक्षांशी इतके तादात्म पावतो, की जर त्या सफल झाल्या नाहीत तर आपल्या ऊर्जेची आग होते, ती आपल्यालाच जाळत रहाते. या माथेफिरू अवस्थेत हातून वाटेल ते घडू शकतं. नंतर पश्चात्ताप होतो. यातून एक वर्तनसवय निर्माण होते, तुमची सगळी ऊर्जा तीत गुंतून पडते. ज्ञानी...

आध्यात्मिक समतोल

Image
आध्यात्मिक, आतल्या प्रवासाला निघालेली, स्वतःच्य अंतरंगाकडे वळलेली व्यक्ती काहीशा विचित्र समतोलात जगते.   जे मिळालंय त्यात समाधानी असली तरी ती असंतुष्टतेची भावना बाळगते. हे विसंगत वाटेल. माणूस एकतर समाधानी असेल, नाहीतर असमाधानी असेल असं आपल्याला वाटतं. पण आध्यात्मिक व्यक्ती दोन्ही असते. आयुष्याने जे दिलं आहे त्यात ती समाधानी असते पण ‘त्यापलिकडे आणखी खूप काही आहे’ ही जाणीव असल्याने ती आत्मसंतुष्ट होत नाही.  तिची तहान जागी असते म्हणूनच तिला क्षणा-क्षणाला काही नवीन गवसत राहतं. - रजनीश (ओशो)      

भावना: उथळ आणि खोल

Image
 प्रश्न: मी आतून कधी शांत नसतोच. कसलासा अनाकलनीय राग आजही माझ्या आत आहे. ओशो: राग दडपून ठेवू नकोस. आत जे काही आहे ते बाहेर येऊ पहातंय, त्याला बाहेर येऊ दे. खरोखर शांत व्हायचं असल्यास एवढा एकच मार्ग आहे. ज्वालामुखी सुप्त दिसतो तेव्हा सारंकाही निश्चल वाटतं पण कित्येकदा आतमध्ये उद्रेकाची तयारी सुरू असते. थोडा क्रोध बाहेर पडतो, थोडा आत शिल्लक उरतो.    क्रोधाचा काही भाग कळण्याजोगा असतो - तो परिस्थितीशी, लोकांशी निगडित असतो. क्रोधाची कारणं स्पष्ट असतात. पण क्रोधाचा हा वरवरचा स्तर बाहेर फेकला जातो अन् कधी अकस्मात तुमचा सामना क्रोधाच्या स्रोताशी होतो. तुम्ही बावचळता. या क्रोधाचा बाह्य जगाशी संबंध नसतो. हा राग तुमचाच अंश असतो. कोणत्याही कारणाविना अस्तित्वात असलेला हा क्रोध, हा संताप समजावून घेणं फार कठीण असतं, कारण त्याकरता कोणीच जबाबदार नसतं. हा राग तुमच्या आत असतो.  व्यक्तीला प्रथम जगासंबंधित क्रोध बाहेर फेकावा लागेल आणि मग ती क्रोधाच्या खोलातल्या, असंबद्ध स्रोताशी पोहोचू शकेल. हा राग घेऊनच आपण जन्मलेले असतो परंतु त्याकडे आपण बघितलेलं नसतं. खरंतर त्याला जाणून घेण्याचीदेखील ...

शिथिलता

Image
 क्रियाकलापाचं (activity) स्वरूप, त्याचे छुपे प्रवाह समजून घेतल्याशिवाय शिथिल होणं, तणावमुक्त होणं शक्य नाही. तुम्हाला शिथिल व्हायचं असेल तर तुम्ही आपल्या क्रियाकलापाचं निरीक्षण करायला हवं, तो समजून घ्यायला हवा, कारण क्रियांचा हा गुच्छ म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हे. दोन शब्द:  कृती (action) आणि क्रियाकलाप (activity). action म्हणजे activity नव्हे. दोहोंचं स्वरूप पूर्णतः भिन्न आहे. कृती ही परिस्थितीच्या अनुषंगाने घडते, परिस्थितीला स्वाभाविक प्रतिसाद दिला जातो, बस्स. क्रियाकलाप हा प्रतिसाद नसतो, तुम्ही कृतीशील राहण्यासाठी तडफडता, अतिशय बेचैन असता. अनेक लोकांना मोकळं व्हायचं असतं पण ते शिथिल होऊ शकत नाहीत. शिथिल होणं फुलण्यासारखं आहे,  जबरदस्तीने घडवून आणता येणार नाही. बारकाईने लक्षात घ्या - तुम्ही क्रियाकलापात इतके मग्न का? इतका प्रचंड अट्टहास कशाकरता? क्रिया ही शांत, स्वस्थ मनातून उमटते. क्रियाकलाप हा अस्वस्थ मनाचा उद्रेक असतो. तुम्ही क्रिया (act) करा, कृती करा, त्यातून क्रियाकलाप (activity) आपोआप घडू दे. शिथिल होणं, निवांत असणं म्हणजे क्रियाकलापाची आस न उरणं. शिथिलता म्हणजे ...

गुलाब कमळ होण्याकरता धडपडत नाही

Image
 ‘Be yourself’, ‘जे आहात, जसे आहात तसे रहा' - यथार्थाने समजावून घेतल्यास हे पाच-सहा शब्द मानवजातीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरे आहेत,  या शब्दांत गहन अर्थ भरून राहिला आहे. मानवाचा समस्त भूतकाळ 'आपण जे नाही' ते होण्यासाठी अखंड धडपडण्यात व्यतीत झाला आहे.  आपल्याला सतत त्याकरता उद्युक्त केलं गेलंय. ‘ख्रिस्त व्हा, बुद्ध व्हा’. दुसरा ख्रिस्त झाला नाही, दुसरा बुद्ध झाला नाही, होणारही नाही कारण तो निसर्गधर्मच नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होते, अस्तित्वाची पुनरावृत्ती कदापि होत नाही. अस्तित्व म्हणजे सृजनाचा आविष्कार. सृजनाची पुनरावृत्ती होऊ शकत नाही. सृजनशील व्यक्ती नेहमी अज्ञाताच्या दिशेने पावलं टाकतात. ....ख्रिस्ताला जाणून घेणं, लाओ त्झूला समजून घेणं, बुद्धावर प्रेम करणं खूप सुंदर आहे. मात्र त्यांसारखं होण्याचा प्रयत्न करणं हे निरर्थक, केविलवाणं आहे. शतकानुशतकं माणसाच्या मनाची घडण दुसऱ्यांचं अनुकरण करण्यास अनुकूल करण्यात आली आहे. तुम्हाला स्वतःजोगतं राहू न देण्यात पुष्कळांचे हितसंबंध, भयं गुंतलेली असतात. तुम्ही खरोखर जसे आहात, तुम्हाला खरोखर जे वाटतं तसे वागलात तर काय होईल याच...

अवलंबिता की मुक्तेच्छा?

Image
जगात दोन प्रकारच्या विचारधारा अस्तित्वात आहेत. एक म्हणते, स्वतःच्या इच्छेनुसार, संकल्पानुसार वाट्टेल ते करण्याचं स्वातंत्र्य – free will - माणसाला लाभलं आहे. ही कल्पना मुळातच असत्य असल्याने तीविरोधात युक्तिवाद होऊ शकतो,  तसा तो केलाही जातो अन् मग पूर्णतः विरोधी भूमिका घेतली जाते, जी म्हणजे ‘ कोणीही स्वतंत्र नाही. आपण कळसूत्री बाहुल्या आहोत, आपली सूत्रं अज्ञाताच्या हातात आहेत. आपण तर केवळ गुलाम आहोत’. दोन्ही विचारधारा असत्य आहेत. आपण गुलाम नसतो व स्वतंत्रदेखील नसतो. ...समजून घ्यायला जरा कठीण आहे. कारण आपण ‘आपण’ नसतोच, मी केवळ ‘मी’ नसतो, तर पूर्णत्वाचा (wholeness) एक अंश असतो. तुम्ही स्वत:ला पूर्णत्वापासून तोडू पहाल, पृथक करू पहाल, तर तुम्ही व सृष्टी यांमध्ये संघर्ष निर्माण होईल; तुम्हाला कशाच्यातरी आधीन असल्यासारखं वाटेल, एकाकी, असहाय वाटेल. तुम्ही स्वत:ला पूर्णत्वाचा एक भाग म्हणून समजून घेतलंत तर तुम्ही स्वामी असाल, मात्र पूर्णत्वा‘सह’ स्वामी -  पूर्णत्वा‘चे’ स्वामी नव्हे. मुक्तेच्छा, संकल्पशक्ती (free will) असं काही नसतं, आणि प्राक्तन  (fate) असंही काही नसतं. अवलंबिता, स...

पैसा

Image
बहुतांश लोकांना वाटतं की समृद्धी म्हणजे संपत्ती; भरपूर पैसा असणं, त्या पैशाचं प्रदर्शन करणं.   पैसा म्हणून जे आपल्याला दिसतं, तो पैसा नव्हे. पैशाची मुळं खूप खोलवर आहेत. पैसा म्हणजे केवळ हातात घेता येणाऱ्या चलनी नोटा नव्हेत. तुमच्या मनाशी, अंतरंगांशी, तुमच्या वृत्तींशी त्याचा अनिवार्य संबंध आहे. पैसा म्हणजे तुम्हाला वस्तूंबद्दल वाटणारी ओढ, हव्यास; पैसा म्हणजे तुमचं माणसांपासून दूर जाणं; पैसा म्हणजे मृत्यूपासून वाचवणाऱ्या सुरक्षिततेचा आभास; पैसा म्हणजे आयुष्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा तुमचा प्रयत्न....  पैसा म्हणजे केवळ नाणी-नोटा नव्हेत; तसं असतं तर गोष्टी खूप सोप्या झाल्या असत्या. पैसा म्हणजे तुमच्यातील प्रेम – मात्र वस्तूंबद्दलचं, जिवंत गोष्टींबद्दलचं नव्हे. वस्तूंवर प्रेम करणं सर्वांत सोयिस्कर. वस्तू निर्जीव असतात. तुम्ही त्या मिळवू शकता, हस्तगत करू शकता. तुम्ही बंगला विकत घेऊ शकता, राजवाडा घेऊ शकता; तुमची ऐपत असल्यास जगातील भव्यतम राजवाड्याचा मालकी हक्क मिळवू शकता, पण तुम्ही इवल्याशा तान्ह्या बाळाची मालकी मिळवू शकत नाही. छोट्टंसं मूलदेखील नकार देऊ शकतं,  आपल्या स्...

अश्रू

Image
तुमच्यापाशी असलेल्या कित्येक देखण्या गोष्टींहून तुमचे अश्रू अत्यधिक सुंदर असतात, कारण अस्तित्व ओतप्रोत भरून वाहतं तेव्हा अश्रू ओघळतात.    अश्रू नेहेमी दु:खाचेच असले पाहिजेत असं नव्हे; कधी ते अतीव सुखातून येतात, कधी तर अतीव शांतीतून येतात, कधी प्रेमातून निर्माण होतात. खरंतर अश्रूंचा सुखदु:खाशी फारसा संबंध नाही. जेव्हा तुमच्या हृदयाला काहीतरी आतपासून हेलावून टाकतं, तुमचा ताबा घेतं, जेव्हा ते तुम्ही सामावून घेऊ शकाल त्याहून खूप जास्त असतं, तेव्हा ते काठोकाठ भरून वाहू लागतं, म्हणजेच अश्रू पाझरू लागतात.   अश्रू स्वीकारा, त्यांचा आस्वाद घ्या, त्यांचं स्वागत करा. अश्रूंच्या माध्यमातून तुम्हाला प्रार्थना उमगेल.  पहावं कसं, हे तुम्हाला अश्रूंद्वारे कळेल. अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांत सत्य पाहण्याची क्षमता असते.  अश्रूभरल्या डोळ्यांत जीवनाचं सौंदर्य पाहण्याची, त्यातलं वरदान जाणून घेण्याची शक्ती असते.    - रजनीश (ओशो)    

मन

Image
मन म्हणजे भीती. मन फार भित्रं आहे. त्याला कायम सुरक्षिततेची, शाश्वतीची चिंता लागून असते. मात्र प्रेमाचं, ध्यानाचं जग म्हणजे शुद्ध असुरक्षितता; हातात कोणताही नकाशा न ठेवता ते तुम्हाला अज्ञाताकडे घेऊन जातं. आपण कुठे निघालोत ते समजत नाही, नक्की कुठे पहोचणार तेही ठावूक नसतं. संभ्रमही नाही आणि निश्चितीही नाही, ही माणसाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर अवस्था आहे. या क्षणात माणूस एक आरसा होऊन जातो. त्यात उमटणाऱ्या प्रतिबिंबाला दिशा नसते, उद्देश्य नसतं. काहीही करण्याची कल्पना नसते, भविष्य नसतं. ते केवळ त्या क्षणात असतं.   मन स्वभावतःच चिंतामय आहे. ‘आपण कुठे निघालोत, काय शोधतोय' असले गंमतीदार प्रश्न त्याला पडतात. मानवी मनाला सतत भरकटण्याची धास्ती वाटते. काळज्या करण्याची वृत्तीच आहे त्याची. पण 'आपल्याला पाच बोटं आहेत' हे एकदा स्वीकारलं की 'पाचच बोटं का', हा प्रश्न रोज पडत नाही.   विद्यापीठातल्या आमच्या एका प्राध्यापक महाशयांच्या हाताला सहा बोटं होती. ते कायम सहावं बोट लपवायचे. मी त्यांना सहा बोटंवाल्या हातानेच धरता येईल असा एक विशिष्ट कागद द्यायचो. वर्गात हशा पिकायचा. कागदावर ...

लोक जर अगदी खरंखुरं, नैसर्गिक वागू लागले तर...

Image
माणूस निसर्गत:च भावोत्कट आहे. सर्व सर्व भावनांबाबत तो उत्कट आहे. कोणीतरी विचारलं: ‘लोक जर पूर्णतः खरंखुरं, नैसर्गिक वागू लागले, स्मित करण्याचा शिष्टाचार बनावट म्हणून त्यांनी त्याला सपशेल फाटा दिला, ते रस्त्यांवरून किंचाळत, आरडाओरडा करत फिरू लागले, तर काय होईल!?’   हम्म. असं झालं तर बऱ्याच गोष्टी घडतील. पहिलं म्हणजे युद्धं होणारच नाहीत. जगात कुठेही एखादं व्हिएतनाम, इस्राईल बेचिराख होणार नाही. लोक खरं वागायला लागले तर कुणालातरी मारावं, हजारोंची कत्तल करावी इतका प्रचंड राग त्यांच्या मनात साचणारच नाही. लोक नैसर्गिक प्रवृत्तींनुसार वागू लागले तर जगात पुष्कळ फरक पडलेला दिसेल. तुम्हाला वाटतं तेवढा गोंगाट काही ते करणार नाहीत. त्यांना ओरडण्याची मोकळीक असेल, पण ओरडून ओरडून किती ओरडणार, किती काळ? जर माणसाला पूर्ण स्वातंत्र्य असेल  तर आरडाओरडा, भांडणं, शिवीगाळ, निषेध इत्यादी गोष्टी जगातून नाहीशा होऊ लागतील.   हे खरं तर दुष्टचक्र आहे. म्हणजे हे असं आहे की तुम्ही एका माणसाला उपाशी ठेवलंय आणि तुम्ही त्याला अन्नाच्या, फडताळाच्या, फ्रिजच्या आसपास फिरकू देत नाही. त्याला खाण्याची मुभा दिली...

अहंकार म्हणजे बिनबुडाची रिकामी वस्तू

Image
(प्रश्नाचं उत्तर देताना-) ...देव-धर्म, व्रतं-वैकल्यं करून थकलात पण अद्याप ‘करण्या’ने थकलेला नाहीत. आता अन्य काहीतरी करून पहायचं आहे, आजमावून पहायचं आहे. आणि मला विचारताहात, की काय करू? तुम्ही ‘करण्याला’ जेव्हा विटता, ‘करत रहाणं’ जेव्हा थांबवता तेव्हा क्रांती घडून येते. धर्म म्हणजे कर्म नव्हे, धर्म म्हणजे भाव. धर्म म्हणजे अकर्म, अक्रियता. धर्म म्हणजे शून्य, ठहराव.  सक्रियता ही अहांकारोत्पन्न असते. काहीतरी करण्यातून अहंकाराला पुष्टी मिळते. अहंकार करण्यावर पोसला जातो. तुम्ही जितकं करत रहाता, कतृत्व गाजवता तितका तो बळावत जातो. काहीतरी मोठं करून दाखवता तेव्हा तोही फुगतो. गरिबाचा अहांकार छोटा, श्रीमंताचा मोठा. चपराशाचा छोटा अहंकार, राष्ट्रपतीचा मोठ्ठा अहंकार. मोठी मजल मारलीत, अहंकार वाढला. अहंकार सतत आकांक्षा बाळगतो: 'मी ह्यांव करावं - त्यांव करावं, जगाला दाखवून द्यावं, इतिहासाच्या पानांवर मुद्रा उमटवावी.' लहान मुलांच्या मनात आपण महत्त्वाकांक्षेचं विष कालवतो:  'काहीतरी कर्तृत्व गाजवा, कुणीतरी बना, इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरात तुमचं नाव लिहिलं गेलं पाहिजे..'    'निष्क...

वैवाहिक जीवन सुखमय होत नाही, होऊ शकत नाही कारण..

Image
 वैवाहिक जीवन सुखमय होत नाही, होऊ शकत नाही कारण आजवर आपण माणसाला प्रेम करण्याची संपूर्ण मुभा दिलीच नाही. जिथे प्रेम बहरेल अशी व्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही. विवाहसंबंध प्रेमातून उद्भवला तरच सुखदायी ठरतो. आपला उफराटा उद्योग आहे - विवाहातून प्रेम उद्भवेल अशी आपली अपेक्षा असते. तसं घडत नाही. आपण मात्र आपलं घोडं दामटतो आहोत, आजही तेच घडवून आणण्याचा खटाटोप करतो आहोत. विवाहामधून निव्वळ सोय उद्भवू शकते, व्यवस्था उद्भवू शकते, सुरक्षितता उद्भवू शकते, प्रेम नव्हे.  पृथ्वीवर प्रेमाचं भरतं यायला हवं, आणि प्रेम म्हणजे मोठी क्रांती असते. मी त्या क्रांतीसाठी जगाला आवाहित करतो आहे. मी विवाहाविरुद्ध नाही. प्रेमातून विवाह निष्पन्न होईल अथवा होणार नाही याला काडीचं महत्त्व नाही. प्रेमातून जे काही निष्पन्न होईल ते शुभ असेल, मंगलच असेल. प्रेमात असणं, प्रेममय होणं म्हणजे थेट खळाळत्या प्रवाहात उडी – अस्थिरतेत जगणं, केवळ चालू क्षणात असणं, एकाकी असण्याच्या आंतरिक सत्याला खुशाल आलिंगन देणं. परंतु आपण सुरक्षालोलुप असतो. प्रेम ही नसती भानगड वाटते आपल्याला, त्या भानगडीत कोण पडतो! विवाहसंबंधातून मिळणार...

एका प्रस्तावनेतून..

Image
ल्येव तॉलस्तोय लिखित 'इवान द फूल' (Ivan the fool) या कथेचा वामन जनार्दन कुंटे यांनी "भोळ्या रामजीचें रामराज्य" नावाने केलेला (प्रथमावृत्ती १९५२, परंधाम प्रकाशन) स्वैर मराठी अनुवाद नुकताच वाचनात आला. कथेला भारतीय ढंग देण्यात आल्याने खरंतर या अनुवादाला रूपांतर म्हटलं पाहिजे. श्री. कुंट्यांच्या प्रस्तावनेतील काही परिच्छेद इथे उद्धृत करण्यास मला आवडेल:     (गोष्टीतील ) ... तीन भाऊ समाजातील तीन प्रकारच्या लोकांचे प्रतीक आहेत - नेताजी - थोरला भाऊ - लष्करातील मोठा हुद्देदार. धनाजी श्रीमंत व्यापारी आणि रामजी कष्टाळू शेतकरी. यांतील पहिले दोघे प्रतिष्ठित मानले जातात आणि तिसरा हीन समजला जातो. पण वस्तुस्थिति काय आहे? पहिले दोघे ही बांडगुळे आहेत. त्यांचें जीवन रामजीच्या कष्टांवरच अवलंबून आहे. पहिल्या दोघांचें जीवन बाह्यता भपकेदार, बिनकष्टाचे, मान-मान्यतेचें आहे. पण त्या दोघांच्याहि जीवनात भयंकर चढउतार होण्याचा केवढा धोका आहे! रामजीच्या जीवनात भपका नाही, पण चढउतारहि नाही. नदीच्या प्रवाहाप्रमाणे तें संथपणें चाललें आहे. त्यात सुखदुःखाचे मोठे प्रसंग नाहीत पण शांति व समाधान आहे. पण दु...

जगज्जेत्याचे आश्चर्य

 वास्तविक घटना आहे की दंतकथा ते ठावूक नाही.   दिग्विजयाची पताका फडकवत सिकंदर आफ्रिकेत पहोचला. ग्रीकांच्या दृष्टीने रानटी असलेले आफ्रिकन लोक गुण्यागोविंदाने आपापल्या टोळ्यांत रहात होते. त्यांना 'दिग्विजय' म्हणजे काय ते कळणे शक्य नव्हते. सिकंदराचे स्वागत झाले, टोळीतील माणसांनी त्याला आपल्या नायकाकडे नेले. नायकाने 'या पाहुण्याला थैल्या भरून अन्नधान्य, खाद्यपदार्थ देण्यात यावेत' असा आदेश दिला. सिकंदर बुचकळ्यात पडला.  नायक म्हणाला, "आपण इतक्या दूरवर आलात त्या अर्थी आपल्याकडे दुष्काळ पडला असावा, अन्नटंचाई निर्माण झाली असावी, आपल्याला मदतीची गरज असावी असे आम्हाला वाटले. अन्यथा आपला देश सोडून, माणसांचा जथा घेऊन दूर-दूरवर भटकण्याचे कारण काय!" इतका भाबडा, सरळसोट प्रश्न ऐकून सिकंदर मनातल्या मनात वरमला. तरी आपली बाजू सावरून घेण्याकरता चटकन् म्हणाला, "नाही, अन्नासाठी मी तुमच्या प्रांतात आलो नाही. मला तुमच्या चालीरितींची माहिती करून घ्यायची आहे, तुमच्याशी स्नेह करायचा आहे." या उत्तराने नायकाचे समाधान झाले.   काही वेळाने परिपाठानुसार न्यायदानाचे सत्र आरंभले. दोन मा...

साधू आणि देव

 सुखं-दुःखं, खुशाली-अखुशाली, आयुष्यातील उत्पातांमागे काही ठोस कारण नसतं, असं म्हणता येईल. किंवा जणू आपलं स्वतःचं एक अदृश्य गणित, अगम्य वेळापत्रक असल्याप्रमाणे यायचं तेव्हा ते बरोब्बर येतात, असंही म्हणता येईल. उधाण वारा झाडांशी खेळतो त्याप्रमाणं आयुष्य आपल्याला गदगदा हलवतं, आपल्या दारावर टकटक करतं, सुरक्षिततेचा आभासी कोश  भेदून आपल्याला गाठतं - गाठतंच. सारंकाही सर्वदा आपल्या मनासारखं होत राहिलं असतं तर आपण आनंदी ठरलो नसतो. आज आपण ज्या गुंगीत, बेशुद्धीत, धांदलीत  रोजचा दिवस ढकलतो ती गुंगी मग अत्यधिक गाढ असती. तरंगहीन, स्तब्ध डबक्याप्रमाणे बधिरतेने आपण जगलो असतो. मृतावस्थेत जे स्थैर्य असतं, जी निश्चिंतता, सुरक्षितता लाभते ती व तितकीच आपल्याला लाभली असती. एक साधू होता. तो प्रवचनं देत असे, लोक ऐकावयास येत, काही शिधा-पत्र देत. लोक साधूपुढे आपली गाऱ्हाणी मांडायचे, आपलं दुःख सांगायचे. लोक सदानकदा इतके रंजले-गांजलेले असतात याचा त्याला विस्मय वाटे, वाईटही वाटे. देवाकडे त्यानं कध्धीच काही मागितलं नव्हतं. एकदा देवाशी बोलता बोलता तो म्हणाला: "आजवर मी तुझ्याजवळ काही मागितलं नाही. आज मा...
Image
No, that's not how Mr. Salamander would sleep. He'd lay flat as a pat.  He won't get up to pee, nor sip water afterwards.   A pure quake - sweat gathering on dorsal palms - an awful jolt - nothing. A man lays dying; or, fast asleep. Please don't ask me any further. I have to cross worlds for language and grammar in this dead of the night.   Where am I brought?  Dreadful snorting, chomping, howling, empty gurgling: Guards pacing at the gates of Hell? Pigs and wolves wearing armour? It's the man and wife snoring.  You've thoroughly lost your voice like the contents of Mr. Salamander's toolbox or better, his voice-box.   Eyes, eyes, how you hurt me, yellow and glum! Who will dunk you back into sleep?     Picture Credits: Not me

आन्द्रेइ् तार्कोव्स्की तरुणांना उद्देशून...

Image
      आन्द्रेइ् तार्कोव्स्की: थोर रशियन सिनेदिग्दर्शक. दोनातेल्ला बायिल्वो या इटालियन दिग्दर्शिकेनं १९८४ साली त्याच्यावर 'उन पोएता नेल चिनेमा: आन्द्रेइ् तार्कोव्स्की' (Andrei Tarkovsky: A Poet In the Cinema) नामक माहितीपट चित्रित केला. माहितीपटात एके ठिकाणी "तरुण पिढीला काय सांगशील?" असा प्रश्न विचारला जातो. झाडाच्या बुंध्यावर सरड्यासारखा भासणारा तार्कोव्स्की म्हणतो:  "एकांतावर प्रेम करायला शिका. स्वतःसोबत एकांतात आणखी वेळ घालवा. तरुणाईबाबतची एक समस्या म्हणजे एकटेपण जाणवू नये म्हणून ही मंडळी धिंगाणा घालतात, कर्कश आक्रमकतेने वागतात, दांडगाई करतात. दुर्दैवी आहे ते. माणसानं लहान वयापासूनच आपापलं रहायला शिकलं पाहिजे. म्हणजे एकाकीपणा नव्हे, तर स्वतःचा कंटाळा न येणं. स्वतःशी रमता न येणं, स्वतःपासून पळ काढावासा वाटणं हे फार भयंकर लक्षण आहे...रोगच आहे म्हणा ना." https://www.youtube.com/watch?v=bEpkrrmXTAE

सोनसळ

Image
 जपानच्या राजानं एका झेन गुरुंकडून बागकामाचे धडे घेतले. तीन वर्षं उलटल्यावर झेन गुरु म्हणाले, "शिकवायचं ते सारं शिकवून झालं आहे. केव्हातरी मी तुझ्या बागेला आकस्मिक भेट देईन. तुझ्या विद्येचंं, कौशल्याचं परीक्षण करेन."  त्यांनी राजाचा निरोप घेतला. राजा आपल्या शाही बागेची अधिकच निगुतीनं काळजी घेऊ लागला. कोणता दिवस परीक्षेचा ठरेल कुणी सांगावं! बगिचा नेहेमी साफसूफ, नीटनेटका ठेवला जात असे. अनेक माळ्यांना हाताखाली घेऊन राजा बागेवर मेहनत घेत राहिला, त्या दिवसाची वाट पहात राहिला. अखेर एके दिवशी झेन गुरु राजाची बाग पाहण्याकरता आले. राजाला फार आनंद झाला. गुुरु शांतपणे बागेतून फेरफटका मारू लागले. राजा मूक उत्कंठेनं त्यांच्या मागे चालत राहिला. गुरुंच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता नाहीशी होतेय असं त्याला वाटू लागलं. 'आपल्या हातून काही चूक घडली की काय? कुठे बरं कमी पडलो आपण?'   न रहावून राजानं मौनभंग केला: "काय झालं? आपल्या शिष्यानं बागेवर प्रचंड कष्ट घेतल्याचं पाहून आपल्याला आनंद झाल्याचं दिसत नाही. काही चुकलं का आमचं?" "बाकी सर्व छान आहे, पण सोनसळी पानं कुठायत? त्यांचा स...

शान्ता ज. शेळके यांनी सांगितलेला एक प्रसंग

बालपणीचा एक प्रसंग शान्ताबाईंनी आपल्या ललितलेखात वर्णिलेला आहे: एकदा नात्यातल्या, की ओळखीतल्या एक बाई घरी आल्या. शान्तेची आई व त्या बाईंच्या गप्पा चालल्या. आईच्या गळ्यात नव्यानंच घडवलेली टपोऱ्या मण्यांची मोहनमाळ होती. बाईंचं लक्ष चटकन् माळेकडे गेलं. "..नवीन घडवलीत वाटतं मोहनमाळ." "हो. नवीच आहे." "मणी टप्पोरे आहेत की. लाखेचे असतील. एवढे मोठे मणी शुद्ध सोन्याचे कसे असणार!" आई काहीच बोलली नाही. नुसती हसली. यामुळे त्या बाईंना कसलंसं अगम्य समाधान वाटलं असावं. त्यांच्या मुद्रेवर ते स्पष्ट झळकत होतं. चहा-खाणं झाल्यानंतर बाई आपल्या घरी निघून गेल्या. लहानग्या शान्तीनं प्रश्न केला: "आई, लाखेचे मणी म्हणजे काय गं?" "अगं, लाख नावाचा एक पदार्थ असतो. सोनं परवडत नसेल तर या लाखेचे मणी बनवतात आणि वरून सोन्याचा पातळ पत्रा चढवतात फक्त."  "तुझ्या माळेचले मणी लाखेचे आहेत??" मोहनमाळेकडं संशयानं पहात शान्तेनं विचारलं. एखादी वस्तू आपल्याला वाटली तितक्या मोलाची नाही या भावनेनं तिचा हिरमोड झाला होता. शान्तेचा उतरू लागलेला चेहरा पाहून आईला हसू कोसळलं. ...

A short note to myself

The question whether I can teach (anything) is linked intimately with whether I can learn. Have you the energy, the curiosity, the patience, the humility? There's no teacher, really. Anyone who takes up the task/title of a teacher has only to nurture the atmosphere of learning, to oil the wick of awareness in oneself and in the student.

दहा निघाले की एखादा पहोचतो!

काही शतकांपूर्वीची गोष्ट. तिबेटमधील एका मोठ्या बौद्ध आश्रमानं सीमावर्ती भागातील एका छोट्या आश्रमाच्या उभारणीस हातभार लावला. बांधकाम पूर्ण झालं. आता तेथील प्रमुखपद सांभाळण्याकरता योग्य भिक्षु पाठवणं तेवढं बाकी होतं. मोठ्या आश्रमाच्या प्रमुखानं दहा भिक्षुंची निवड केली, त्यांना नव्या आश्रमाच्या दिशेनं पाठवलं. सर्वांना प्रश्न पडला: 'गुरुपद ग्रहण करण्यासाठी एकाच व्यक्तीची गरज असताना दहाजणांना का बरं  धाडण्यात आलं? तिकडूनही प्रश्न आला: 'एकाचीच गरज असताना दहाजण कशाला? त्यांतील योग्य कोण ते आम्ही कसं ओळखावं?' "जरा धीर धरा. पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल," इकडचे गुरु म्हणाले. दोन्ही आश्रमांमध्ये पुष्कळ अंतर होतं. मार्ग खडतर, पहाडी होता - पायी प्रवास. साधारण तीन आठवड्यानंतर तिकडून निरोप आला: 'तुम्ही जे दहा भिक्षु पाठवले होते त्यातील एकच सुखरूप पहोचला आहे.' तेव्हा गुरु म्हणाले, "पाहिलंत? दहा पाठवले की एखादा पहोचतो !" मागाहून सर्वांना पूर्ण कथा समजली: दहा भिक्षुंच्या गटाला प्रवासात पहिलं गाव लागलं तेव्हा गावच्या वेशीपाशीच एका गावकऱ्यानं सर्वांत पुढे चालणाऱ्य...

Magic of Meaning

'Meaning-making' happens at the expense of implicit meaning - meaning which is already present in a poem, in a painting, a film, a novel etc. Subtle or pronounced, it shall come upon you in its own way, in its own time - all you have to do is to be there, be aware, be naked, listening, watching, receptive. It shall often ferry you to the realm of silence, through the landscape of your own self. You can't make anything out of this import, so light yet so charged it is! and solid like a tree laden with fruit! You shall fail to 'capture' this significance. Your words shall repudiate you,  your tongue shall misstate you. 'Let me explain more, let me illustrate further,' you may think. But that never was the issue. You tried to express the inexpressible. You didn't leave room for silence and surprises, you didn't let the snorts and sighs and tears and laughter take over.. you didn't let the enchantment work. Who asked you to take the entire burd...